Friday 1 April 2016

पानी रे पानी तेरा रंग कैसा?
भविष्यात डोळ्यांना पाणी न यावे 
यासाठी आत्ताच प्रयत्न केलेले बरे यासाठी प्रतिक्रया    


     
       

      महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाने आपले रंग चांगलेच दाखवून दिल्याने हे 'जलमाहात्म्य' आतातरी आमच्यासारख्या 'सुशिक्षितांना' कळले आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उलट पाण्याची भीषण टंचाई असतानाच आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून पाण्याची मोठी उधळपट्टी करणारे 'लातुरी' महाभाग आम्ही बघितले आहेतच. विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागात नळाला पाणी येण्यासाठी ८ ते १० दिवस वाट बघत बसावे लागण्याचे चित्र असतानाच 'पांढऱ्या मीडियात' मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत 'शॉवर' कसा घ्यावा? या विषयावर करण्यात येणारे तज्ज्ञाचे मार्गदर्शन डोळ्यांना पाणी आणणारे ठरते. केवळ पाणीबचत आणि एखाद् दुसऱ्या 'जागृत' एनजीओचे 'कॅम्पेन' याने हा प्रश्न सुटणार नसून, पर्यावरणाला समृद्ध करणाऱ्या परंपरा त्यासाठी आम्हाला निर्माण कराव्या लागतील.

No comments:

Post a Comment