Wednesday 30 March 2016

अजब तुझे सरकार…
विजय मल्ल्या प्रकरणी एक प्रतिक्रया 

     
 

      ‘प्रसिद्ध’ उद्योजक विजय मल्ल्या यांनी बँकांकडून घेतलेल्या ९ हजार कोटी रुपयांपैकी ४ हजार कोटी रुपयांची परतफेड करण्याची तयारी न्यायालयापुढे दाखवली. मुळात, रंगेल्याचे रंकरयतेवरील हे थोर उपकारच म्हटले पाहिजे. शेवटी 'गेलेला माणूस कधी परत येत नाही' हा भारतीय तत्त्वज्ञानाचा नियम त्यांनी यानिमित्त खोटा ठरविला आणि 'सजग' मीडियालाही खोटे पाडले, असेच आता म्हटले पाहिजे. मुळात भ्रष्टाचार हा काही आपल्या देशात नवा नाही. 'रोजचेच मढे त्याला कोण रडे?' अशीच अवस्था भ्रष्टाचाराच्या रोगाबद्दल झाल्याचे दिसून येते. त्यातूनच त्यावर औषधे शोधण्याचा प्रयत्न करणाराच मूर्ख असल्याचेही चित्र रंगविले जाते. मग अवघ्या व्यवस्थेला बोट लावून गेलेले 'आदरणीय' मल्ल्याजी शहाणे समजले जातात. मात्र, 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' कधी ना कधी होतोच; त्यातलाच हा प्रकार. मुळात 'चोर सोडून सन्याशालाच फाशी'ची परंपरा असल्याने असे प्रकार आपल्या नशिबी आहेतच, हे सांगणे न लागे.   

No comments:

Post a Comment