Sunday 25 November 2018

Salute to Ambedkar



On the occasion of '69th Constitution Day of India' I Salute to the great struggle of Dr. B. R. Ambedkar, who is the father of our Constitution. For the formation of an egalitarian society he established the constitution on the basis of Freedom, Equality, Justice, Fraternity. Happy Constitution Day.

#WeThePeople #JaiBhimIndia

Friday 23 November 2018

माझ्या बाबांच्या पाच कविता  


१) पाहिले मी

रक्त माणसांचे स्वस्त पाहिले मी
गळे कापणारे दोस्त पाहिले मी

अव्यक्त ईश्वराचे अस्तित्व पुजणारे
नरक यातनेने भयग्रस्त पाहिले मी

थापा प्रबोधनाच्या मारोत बापडे हे
चारित्रही तयांचे उध्वस्त पाहिले मी

ज्यांच्या मुळे मिळावी मुक्ती उभ्या जगाला
ते धर्म पंडितांचे बंदीस्त पाहिले मी

स्त्रीच्या महानतेचा आदर्श सांगणारे
धंद्यात ते मुलींच्या व्यस्त पाहिले मी

'आम्ही सनातनी' ही जे मारतात शेखी
मंदिरालयात काही विश्वस्त पाहिले मी

कारागृहात ज्यांचा आजन्म जन्म जावा
सत्तेत राज्यकर्ते निर्धास्त पाहिले मी

ही वाटचाल सारी अंधारल्या दिशेने 
पूर्वेसही उद्याचे सूर्यास्त पाहिले मी


२) प्रबोधन

स्वार्थात आपलाल्या जगतात लोक सारे
बाता प्रबोधनाच्या बकतात लोक सारे

जे दिन रात्र सारी करती हरामखोरी
त्यांच्या समोर इथले झुकतात लोक सारे

सडकीच संस्कृतीही कुजकी विचारधारा
प्रेमास संशयाने बघतात लोक सारे

हा रोज पाहातोरे व्यापार चाललेला
अब्रूसही दुकानी विकतात लोक सारे

अपवाद सांगण्याला जे सभ्य काही लोक
त्यांच्या वरीही आता थुंकतात लोक सारे


३) पर्याय

गांधींच्या देशात, उरली ना शांती ।
युद्धाला विश्रांती, नाही येथे ।।

कळला न आम्हा सुखाचा तो अर्थ ।
श्रमता का व्यर्थ ? स्वार्थासाठी ।।

नाही ओळखली काळाची पाऊले ।
पाठीशी धावले, प्रदूषण ।।

शत्रू ते लपले, मित्रांच्या रूपात ।
सहद तुपात मिसळले ।।

साऱ्या समस्येला, बापूंचा पर्याय ।
दुसरा उपाय असेची ना ।।


४) माझा गाव

परतून आज माझे मी गाव पाहिले
त्याच जाती रीती भेदभाव पाहिले

शूद्र, ब्राह्मणांची भिन्न भिन्न वस्ती
माणसांच्या सभ्यतेला विभागतात रस्ती
बंदीस्त धर्म आणि त्यांचे देव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

सावकारी पाश तेच तेच गाव गुंड
राजकीय अस्मितेचे माजलेहे बंड
सत्तेसाठी लाचारीचे डाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

चालतीचे मित्र होते आज झाले पारखे
भुललेत भाकरीला तेही श्वाना सारखे
स्वार्थप्रवृत्तीचे बेबनाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले

कालचा तो काळ गेला सभ्य होते चोरही
आज आता लाज वाटे अपराध करती थोरही
नितीभ्रष्ट त्यांचे स्वभाव पाहिले
परतून आज माझे मी गाव पाहिले


५) कविता

वेदनाही विचारांचा धडा वाचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

भ्रष्ट झाले श्रेष्ठ आता तुम्ही आम्ही नष्ट 
सत्तेभोवती जमा झाले सारे नतद्रष्ट
काळ्या पैश्यामुळे त्यांचे धन साचू लागते 
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

मुर्दाळ संस्कृतीचे कितीतरी गोडवे
आळदांड विकृतीने केले किती आडवे
सभ्यतेचा बुरुजही असा खचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

कटं करून संकटं भेट दिली जातात
हटकून मित्रही थेट दूर होतात
उपहास आपोआप जेव्हा पचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते

लाचारांच्या गर्दीमध्ये व्हावे समाविष्ट
नाहीतर अहोरात्र सोसणे हे कष्ट
डोक्यामध्ये समतेचे भूत नाचू लागते
कविताही मनामध्ये तेव्हा सुचू लागते


- मदन रामटेके
मो. 9975209730 
रिद्धपुर, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती, पिन को. 444704

Thursday 22 November 2018

Why Are We Against Brahmanical Patriarchy ?


Contemporary Indian Hindu society is a product of traditional Brahmanical caste and gender based fundamentalism. Brahmanism is not only a discriminatory philosophy but also a strong foundational source of human injustice. In Indian social perspective, caste and gender hierarchy are the organizing principles of the Brahmanical social order and  are closely interrelated. For the betterment of humanity, we must realize the importance of annihilation of caste, class and gender based discriminatory hegemonic system.

Predominantly, patriarchy is a social system in which males hold primary power mostly on social privileges, economic resources, politics, moral authority etc. Patriarchy is associated with a set of ideas, a patriarchal ideology that acts to explain and justify this dominance and attributes it to inherent natural differences between men and women. In India, patriarchy and caste system are working together and this patriarchy is mostly rooted in Brahmanical religious philosophy.

Jack Dorsey, CEO, Twitter
In order to talk about Brahmanical patriarchy, we need to understand the context of the recent debates related to the topic first. Last week Twitter chief executive officer Jack Dorsey visited  India. During his visit he met a group of women journalists for an off the record conversation. After going back Dorsey published a group photograph in which he is standing with the above mentioned women journalists and holding a poster of ‘# Smash Brahmanical Patriarchy’. After  Dorsey posted this,there were thousands of tweets on this issue. According to Twitter India's official post, “Recently we hosted a closed door discussion with a group of women journalists and change makers from India to better understand their experience using Twitter. One of the participants, a Dalit activist, shared her personal experience and gifted a poster to Jack.” Then Twitter India  published another explanation on this issue - “It is not a statement from Twitter or our CEO, but a tangible reflection of our company's efforts to see, hear, and understand all sides of important public conversations that happen on our service around the world.” Through the medium of social media posts, anti caste, class and gender based discriminatory movement has created a new discourse against Brahmanical patriarchal system. This debate mostly focuses on two dimension. One is cast-ism and the other is patriarchal hegemony. When we are looking at this question from a ‘perspective from below’ then we realize  the interrelation between the question of caste based discrimination and gender based monopoly in all sectors of daily life. In the framework of traditional Indian ideology there is no scope for the freedom of women. Well known feminist thinker Uma Chakravarti (arguing about sexual control by upper castes and patriarchal society) in her famous Essay -‘Conceptualizing Brahmanical Patriarchy in India' said that “the general subordination of women assumed a particularly severe form in India through the powerful instrument of religious traditions which have shaped social practices. “Caste purity, the institution unique to Hindu society.” In India, women become a tool to carry  caste system. This means that the gender and caste issue are interlinked in Indian perspective.


Till today, sexuality of women has been controlled by upper caste man. They have no control over their marriage  property, child production etc . There is no place for their separate ideas and opinions. Women are not able to live their life with freedom and equality and other democratic values. After the  strengthening of varnavyavstha and application of caste system, untouchables and women have not been able to save their human rights. Because the purpose of Brahmanical religious philosophy was to create a system of selfishness of the so called upper caste communities on the basis of discrimination against DalitBahujan and all women in India.

Whenever Indian feminist movement refuses to take a  stand against fundamental structure which is essentially Brahmanical patriarchy, they lose the chance of winning the historical battle on this issue. According to father of the Indian constitution and our great pathfinder Dr. B. R. Ambedkar  women movement must be strongly supported. He said, “I strongly believe in the movements run by women. If they are truly taken into confidence, they may change the present picture of society which is very miserable. In past, they have played a significant role in improving the conditions of weaker sections and classes.” In this holistic discussion on Brahmanical patriarchy we are not criticizing or blaming any caste or community. Our battle is against mentality and discriminatory hierarchy of caste, class and gender based hegemonic discrimination.


Sunday 4 November 2018

अरुणाजींशी पहिली भेट
जेष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य 
संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड निश्चितच बदलांची नांदी आहे…

आ. अरुणा ढेरे


गेल्याच आठवड्यात अरुणा ढेरे यांची निवड यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाल्याची बातमी आली. मुळात, दर वर्षी होणाऱ्या वाद - प्रवादांना फाटा देत सम्मेलनाध्यक्षांची सन्मानपूर्वक निवड करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचे फलित म्हणून अरुणाजींची ही निवड निश्चितच नव्या बदलांची नंदी म्हणून बघण्यास हरकत नसावी. त्यांच्या या निवडीने मराठी साहित्य विश्वात एक नवे पर्व सुरु होत असल्याची प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त होते आहे. या निवडीवर सोशल मीडियावरही अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, व्हाट्सअप आणि ट्विटर आदींवर शुभेच्छा देणारी रीघ लागली. माझ्या फेसबुक पेज साठी मी ही अरुणाजींबरोबरचे जुने फोटो शोधत होतो आणि मनात मात्र त्यांना भेटल्याच्या, त्यांच्याशी बोलल्याच्या आठवणी जाग्या होत होत्या.


मी पुण्याच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालया’त असतांनाची गोष्ट. पत्रकारिता विभागाचा एक विद्यार्थी म्हणून त्यावेळी मी तिथे शिकत होतो. सांस्कृतिक समृद्धी ही पुण्याची ओळख. अर्थातच, आमचं महाविद्यालयही त्याला अपवाद नव्हतं. त्यावेळी बरेचसे मान्यवर आमच्या महाविद्यालयाला भेट देत असत. त्यातून त्यांच्या व्याख्यानाची, त्यांच्याशी भेटण्या-बोलण्याची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळत असे. त्यावेळी पत्रकारिता विभागातील आम्ही काही विदयार्थी महाविद्यालयाच्या उपक्रमांमध्ये आवर्जून सहभाग घेत असू. एकदा महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनातील वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनसाठी अरुणाजी आमच्याकडे येणार असल्याची बातमी मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितली. आम्ही आनंदून गेलो. मुळात, ज्यांच्या विषयी, ज्यांच्या साहित्याविषयी नेहमी वाचायला मिळतं त्यांनाच साक्षात भेटण्याची ही संधी आम्हाल चालून आली होती. कार्यक्रमाच्या दिवशी जरा तास - दीड आधीच आम्ही काही निवडक विद्यार्थी मराठी विभागात दाखल झालो आणि अरुणाजींच्या येण्याची वाट बघत बसलो. त्या आल्या. निश्चितच त्यांना भेटणं त्यावेळी आमच्यासाठी सुवर्णसंधीच होती. त्यांची फार काही पुस्तकं वाचली होती असं नाही पण एक अनामिक आकर्षण साहित्य क्षेत्रातल्या या हस्ती बद्दल निश्चितच आमच्या मनात होतं. त्या आल्या त्यावेळी नेमकं काय बोलायचं ? सुरुवात कुठून करायची ? असं काहीच सुचत नव्हतं. आमच्या मनातलं बहुतेक अरुणाजींनी ओळखलं असावं. त्यांनीच स्वतःहून आमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि मनावरचा भार हलका झाला. मुळातच त्यांच्या आवाजात एक प्रकारचा आश्वासक असा मातृत्वाचा आधार आहे. खूप छान वाटलं. आम्ही फुलात गेलो. त्यांच्या साहित्यातलं फार काही वाचलं नसल्याबद्दल मी सांगितलं, त्यावर त्या छान हसल्या. नंतर मात्र आमच्या गप्पा आणखीच फुलायला लागल्या. अनेक विषयांवर त्यांनी आपलं मत आमच्यासमोर व्यक्त केलं. तेव्हा सहज बोलता - बोलता कुणीतरी माझ्या मित्राने मी विदर्भातल्या ‘रिद्धपुर’ गावाचा असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर अगदी आतुरतेनं त्यांनी गावाबद्दल विचारलं. मराठी साहित्याचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ माहिमभट्टांनी याच आमच्या ‘रिद्धपुर’ गावात लिहिला. मराठी भाषेची आद्य कवयित्री महदंबा हीनही ‘धवळे’ या भूमीवर रचलं. महानुभाव मराठी साहित्याची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. त्यांनाही या साऱ्या विषयाची मुळातच गोडी असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. माझ्या गावा विषयी, महानुभावांच्या मराठी साहित्यातील योगदानाविषयी त्यांच्याकडून ऐकून एक वेगळा जिव्हाळा आमच्यात निर्माण झाला. पुढे कार्यक्रमाची वेळ झाली. आणि आम्ही त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आलो. त्यावेळी त्यांनी स्नेह संमेलन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून खूप सुंदर भाषण केलं. त्यांच्या विदयार्थी दशेतले वक्तृत्व स्पर्धेतले अनुभवही आम्हाला सांगितले. ते सारं काही प्रेरणा देणारं होतं. कार्यक्रम संपला. आम्ही त्यांना सोडायला आलो. त्यावेळी घेतलेली त्यांची सही मी अजूनही तशीच जपून ठेवली आहे.


पुढे मात्र, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं सातत्यानं त्यांच्याशी संपर्क आला. पुण्यात पत्रकारिता करीत असतांना बऱ्याच विषयांवर त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी मला मिळाली. आजही फोन वरून कधीतरी त्यांच्याशी बोलणं होतं. तो मायेचा आवाज नवं काहीतरी करण्याची, धडपडण्याची प्रेरणा देतो.


आज जेव्हा अरुणाजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या तेव्हा मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या कुणाही इतका आनंद मलाही झाला. मुळात, साहित्य संमेलनाच्या निवडणुका, त्यातील घाणेरडं राजकारण, गट्ठा मतं आणि त्यातून साहित्य बाह्य आरोप-प्रत्यारोपातून कलुषित होणारं वाङमय विश्व यातून उच्च दर्जाच्या साहित्यिकांना अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं आहे. त्यातून साहित्यिक, उपसाहित्यिकाही नसणारे लोक अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून स्वनामधान्य झालेत. या साऱ्या प्रक्रियेत कुठे तरी खंड पडवा आणि अत्यंत मानाचं, महत्वाचं असं हे पद सन्मानानं देण्यात यावं याविषयी मराठी साहित्य विश्वात सातत्यानं चर्चा होत होती. याविषयी सहज एकदा प्रा. सदानंद मोरे सरांना विचारलं असता, “लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रणाली स्वीकारली की हे जय-पराजय होणारच” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. ते ही खरंच आहे. मात्र, महामंडळाच्या आजच्या या निवड प्रक्रियेने नवा मार्ग पुढे आणला आहे. काळाच्या कसोटीवर कोणत्याही साहित्य प्रवाह आणि साहित्यिकांवर अन्याय न होता हे सारे सुरु राहिले तरच ते प्रासंगिक ठरेल.


आज अखिल भारतीय साहित्य महामंडळाने यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सन्मानपूर्वक निवडीचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय निश्चितच मोलाचा मानावा लागेल. अरुणाजी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या आहेत. तब्बल १८ वर्षांनी पुन्हा एकदा एक महिला संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. संमेलनाच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिलांना आजवर संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांना मिळालेला हा मान मोलाचा आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून त्या आता नेमकी काय भूमिका मांडतात याविषयी सारीचें लक्ष लागून राहिले आहे. समकालीन भयग्रस्त वातावरणात साहित्य आणि साहित्यिकांची जबाबदारी त्या कशा मांडतात हे बघणे महत्वाचे ठरेल.

************

पूर्वप्रकाशित

दैनिक जनमाध्यम

दिनांक ६ नोहेंबर २०१८

अक्षरनामा
अरुणा ढेरे सध्याच्या भयग्रस्त वातावरणात आपली जबाबदारी 
कशी निभावतात, हे महत्त्वाचं !

महाराष्ट्र दशा
अरुणाजींशी पहिली भेट

डेली हंट
अरुणाजींशी पहिली भेट

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra+desha-epaper-mahdesh/arunajinshi

+pahili+bhet-newsid-100862844