Tuesday 5 May 2015


मराठीच्या पाऊल खुणा 

         
       दिल्ली अभ्यास दौर्याच्या पार्श्वभूमीवर 'संवाद' चा या वेळचा अंक काढायचं ठरलं आणि पुन्हा एकदा पत्रकारीतेच्या आम्हा विद्यार्थ्यांच्या लेखण्या 'अनुभवांची दिल्ली' लिहायला लागल्या.दिल्ली दौर्यात आठवणींचा अमिट ठेवा आमच्या गाठीशी होता.असेच एकदा अभ्यासाचा भाग म्हणून 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' च्या कार्यालयात गेलो होतो. PTI चे अध्यक्ष विजय सातोकर यांनी "मराठी इतिहासाच्या काय पाऊलखुणा तुम्हाला दिल्लीत जाणवल्या?" या प्रश्नाने थोड चमकुनच का होईना पण दिल्ली आणि मराठी  यांचा धान्दवडा घेण्याचा प्रयत्न झाडून आमच्या सार्यांच्याच मनाने केला होता.खरच 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा…' अस म्हणत दिल्लीच काय तर सुदूर अटकेपार झेंडे रोवत परमुलुख महाराष्ट्राने पादाक्रांत केला होता. परकीयांना झुंजत ठेवत मराठी स्वराज्याच्याही पुढे जात इथल्या मर्द मावळ्यांनी 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व' हा संदेश घेऊन मराठीचे गोडवे गात आपल्या पराक्रमाची शिकस्त केली होती.आणि एके काळी लौकिकार्थाने 'लोकल' असलेल्या मराठमोळ्या संस्कृतीस 'ग्लोबल' करण्यासाठी जीवच राण केल होत.खरच काय बर नात असाव महाराष्ट्रच,मराठीच या सार्या प्रदेशांशी? दिल्लीशी? पंजाबशी?             
        दिल्लीची मेख महाराष्ट्राने राखल्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच आणि आज तर चक्क मराठी साहित्याचा महामेळा असलेले अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन दिल्ली नजीकच्या पंजाब राज्यातील घुमान या छोट्याश्या गावी होत आहे. दिल्ली विशेषांकात आता घुमानचे काय काम? हा प्रश्न कोणत्याही चर्चकास पडला तर नवल नाही, पण मराठीच्या पाऊलखुणा शोधतांना एक पायवाट नामदेव नावाच्या महाराष्ट्राच्या सुपुत्रास सुमारे साडेसातशे वर्ष्यांपूर्वी दिल्लीतही सापडली होती म्हणूनच समकालीन  संदर्भ शोधतांना दिल्लीवाटे केलेली ही घुमान वारीही जर प्रसंगीकच वाटते.        
         बाराव्या शतकात महाराष्ट्र ते उत्तर हिंदुस्थान असा प्रवास करत महाराष्ट्र धर्माची संतपताका खांद्यावर घेऊन नामदेव दिल्ली गाठत होते. पुढे पंजाब मधील घुमान याच नामदेवांनी वसवलेल्या गावातून सकाळ मराठी संतांचा संदेश त्यांनी जगाला दिला होता. स्वतंत्र,समता,न्याय,बंधुत्व यांची शिकवण देण्याच्या मराठी संत परंपरेचा वारकरी होत नामदेवांनी आधुनिकतेची मुहूर्तमेढ याच घुमान मधून रचली होती. म्हणूनच कदाचित नामदेवांचे आणि पर्यायाने मराठीचे सीमोल्लंघनाची स्मृती जपन्याकरीताच अ.भ मराठी साहित्य संमेलनाचा हा प्रपंची योजिला असावा.     
               मुळात सामाजिक असमानतेच्या पायावर उभ्या असलेल्या तत्कालीन अविचारधारेस छेद देत संतांनी ज्ञानभाषेचा दर्जा लोकभाषा मराठीला मिळवून देण्याचा अविरत प्रयत्न केला होता. १२०८ मध्ये महिमभटांचा सर्वज्ञ श्री चक्रधारांच्या जीवनाधारित लीळाचरीत्र, मुकुन्दराजांचा विवेकसिंधू, १२१२ मधील ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरी पासून ते संत तुकोबा,चोखोबा च्या वाटेने येत केशवसुत,कुसुमाग्रज करीत अलीकडे अगदी नेमाडपंथापर्यंत वगैरे हा 'मराठीचा वेलू' गगनावरी जातची राहिला.असे म्हणतात की, 'मराठीचा प्रवास रसाळ नामदेवांपासून ते ढासळ नामदेवांपर्यंतचा' मात्र या सकाळ साहित्तीकांच्या स्मृती जनमानसात चिरंतन राहाव्यात याच साठी हा शब्द मेळा नवे पाऊल ठरावा. घुमान या तीर्थक्षेत्री सुदूर महाराष्ट्राबाहेर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन कालपरवापर्यंत सुरु असालेल्या ५W-१H च्या वाद-प्रवादान्मधून बाहेर येउन दिमाखाने सम्पन्नतेकडे प्रस्थान करीत असतांनाच मराठी साहित्य,महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्ली यांचा परस्पर सह संम्बंध गोत्रात्वाचा अगदी 'रुहानी रीश्त्याचा' वाटतो. पंजाब गव्हाचे कोठार तर महाराष्ट्र ज्वारीचे,पंजाब शक्तीचे माहेर तर महाराष्ट्र भक्तीचे,पंजाब शोर्याची कर्मभूमी तर महाराष्ट्र धैर्याची,पंजाब योध्यांची रणभूमी तर महाराष्ट्र संतांची तत्वभूमी. एव्हढेच काय तर महाराष्ट्रातील नांदेळ ही आमच्या तमाम सिख बांधवांसाठी गुरु गोविंदसिंग यांच्या स्मरणार्थ पुण्यभूमीच.खरच जात,धर्म,पंथ,पक्ष,प्रांत,भाषा,यांच्या पलीकडे जात घुमान साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समतेचे दिवे ममतेने लावण्याचा प्रघात आतातरी पोळलेल्या देश्यात उपयोजित व्हावा,हा आशावाद व्यक्त करूयात.
              मराठी साहित्यातील जेष्ट साहित्तिक सदानंद मोरे हे या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत."विवेकाचा जागर करण्याचे विचारपीठ  म्हणजे साहित्य संमेलन" ही रास्त भूमिका त्यांनी मंडली आहे. ग्रंथ दिंडीची काही वर्षात मोडलेली परंपराही या वर्षीपासून सुरु करण्याची अभिनंदनिय घोषणा संयोजकांनी केली आणि त्यात नामदेव गाथेची ब्रेल लिपीतील प्रतही ठेवण्याचा निर्णयही स्वगातार्यच आहे. मात्र गरज आहे विषमता आणि अंधश्रद्धेचे उसने घेतलेले अंधत्व दूर करत पुरोगामित्वाच्या संत मार्गाने पुढे जाण्याची.घुमनचा हाच संदेश साहित्य पालखीचे भोई 'गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत' जनमानसात पोहचवतील याच आशेसह… ठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल…