Friday 19 September 2014

 भारत भाग्य विधाता



                                                      भारत भाग्य विधाता                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   समस्त  भारतीय जनमानस आधुनिक कालखंडात महासत्तेच्या संकल्पनेने अत्यंत प्रभावित झाले असतांनाच या नव्या भारताच्या निर्मितीत तरुणाईची भूमिका महत्वाची ठरत आहे. जग जेथे आपल्या तरुणाईचा चेहरा गमावून बसले आहे,तेथेच भारत मात्र अधिकाधिक तरुण राष्ट्र म्हणून उदयास येत आहे.हे भारतीय तारुण्य पुढील शंभर वर्ष जगावर आपले वर्चस्व निर्माण करील. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात जेथे आपल्या समस्यांचे निर्मुलन करण्या साठी आपण बाह्य जगावर अवलंबून होतो तेथेच आज निर्मिलेले उच्य तंत्रज्ञान आणि आदर्श भारतीय लोकशाही या माध्यमातून भारताने जागतिक पेठ काबीज करण्या साठी प्रयत्न चालवले आहेत . मात्र एकीकडे असलेली अत्युच्य श्रीमंती तर दुसरीकडे पराकोटिची गरिबी भारतीय महासत्तेचे भीषण वास्तव प्रस्तुत करते आहे .  
                                                                                 भारताने केलेला लोकशाही मार्गाच स्वीकार जगाच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे . मात्र जेव्हा भारत म्हणजे "गुलामांचे राष्ट्र" ही  टीका करणाऱ्या मंडळीना या महान प्रवासाने चांगलेच प्रती उत्तर मिळाले आहे. तरुणांच्या अभूतपूर्व त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य याच तरुणांच्या महान इच्याशाक्तीच्या बळावर टिकले आणि  भारतीय संविधानाने दिलेला मार्ग उपयोजित करून केलेली वाटचाल प्रेरक ठरली .सतत्यने होणारी जागतिक स्तिती बदलाची करणे भारतीयांनी आज जाणली आहेत. अर्थव्यवस्थ,शेती,आरोग्य,शिक्षण,उर्जा,दळन वळण ,तंत्राज्ञान  आदी क्षेत्रांमध्ये झालेली प्रगती त्याच सुप्त उर्जेचे फलित आहे जी इथल्या तरुणांच्या हृदयांमध्ये जिवंत रूपाने ज्वलंत होती.गरज आहे ती विकास आणि उर्जेचे सार्वत्रीकरण करण्याची . ज्या वेळी इथला श्रीमंत वर्ग चंगळवादाच्या आहारी जाऊन साधनांची उधळण करतो त्याच वेळी इथला गरीब वर्ग मात्र उपाशी राहूत रात्र  घालवतो. शिक्षणाचा अधिकार तर मिळाला पण सामान शिक्षनाच ध्येय्य मात्र दूरच राहिले . समतेचे गीत गात विषमतेची बीजे मात्र तशीच राहून त्यातून वाढली जंगले जातीवादीआणि अंध धर्मवादाची.त्यातून होणारऱ्या दंगलींनी  तरुणाईला जाळ्यात घेतलं ते विकास मार्गावरून दूर नेणाऱ्या राष्ट्राहीतावरोधी विचारांच्या गर्तेत सातत्यान वाहवत जाण्या साठी .तरुणाईची  होणारी दिशाभूल,निवडनुकीच्या बाजारात होणारा पराकोटीचा युवाशक्तीचा वापर आणि तथाकथित विचारधारेची दिली जाणारी अफू यातून तरुणाचा कल गेला तो दंगलवादी मानसिकतेच्या बाजूने त्यातूनही सावरत इथला तरुण लढतो आहे लढाई स्वतःच्या अस्तित्वाची.स्वतःला सावरत धडपडत करतो आहे प्रयत्न देशाला सावरण्याचा आणि उभारण्याचा.घेऊ पाहतो नेतृत्व हाती आधुनिक भारताचे.राजकीय लोकशिक्षण करीत समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुतेची चौकट जोडत समस्त मानव जातीस आपण सारे एक म्हणत सर्वांना समान संधी विकासाच्या प्रक्रियेत समील होण्याची.आता सुशिक्षित शासकच चालवू शकेल गाढा नव्या भारताचा. आहे आदर्शवाद इथल्या तरुणाच्या नसानसात वास्तवाच्या भानासह.समस्या असतीलही पण परिस्थितीशी झगडायला आहे तय्यार भारतीय तरुण .                                                                                                                                                                                                                           " जन गण मन अधीनायक जय हे, भारत भाग्य विधाता …,"  म्हणत गायलेले राष्ट्र गीत आज इथल्या मना मनातून पेटले आहे आणि भारताच्या भाग्य विधता असलेला तरुण गातो आहे गाणे, भावी सामाजिक क्रांती आणि नाव सृजनाचे! 

Wednesday 10 September 2014

महात्मा गांधी शिक्षण व्यवस्था आणि विचार

             महात्मा गांधी शिक्षण व्यवस्था आणि विचार

                                                    

भारतीय स्वतंत्र समरात ज्या अनेक रणधुरिणांनी आपल्या आयुष्याच रणकंदन केललं त्या महापुरुषांमध्ये म. गांधी यांचा नाव अग्रणी ठरत . गांधी यांच्या आंदोलनाने देशाच्या अन्तःकरणात  नव तेजोत्पत्ती केली. आपल्या सत्यग्रहत्मक तत्वाद्यानास विधायक कार्याची जोड तर त्यांनी दिलीच शिवाय आरोग्य,शिक्षण, बेरोजगारी, भूखमरी,अभाव आदी राष्ट्रीय प्रश्नांवरही आपले विचार मांडले.शिक्षण हा राष्ट्रे विकासाचा आत्मा त्यांनी मनाला . भावी पिढ्यांच्या सशक्त समृद्ध जीवनासाठी आणि राष्ट्र  उभारणीस कारक ठरणाऱ्या जबाबदार नागरिकांची निर्मिती ज्या शिक्षण व्यवस्थेत साध्या ठरेल अश्या व्यवस्थेची आखणी गरजेचे ठरल्याने गांधीनी आपल्या चिंतनाची दिशा जीवन शिक्षण पद्धतीच्या अनुशान्गीकतेने केल्याचे दिसून येते. केवळ कारकून निर्माण करणाऱ्या लॉर्ड मेकोले प्रणीत शिक्षण पद्धतीची मीमांसा भारतीय संदर्भांमध्ये  करूनच ते थांबले नाहीत तर संभावनांना  सक्षम विचारांचे अधिष्ठान हि त्यांनी दिले. गांधींचा हा प्रयत्न म्हणजे नव्या शिक्षण व्यवस्थेच्या योजनेचा प्रयत्नच होय.                       "अपूर्णत्व कडून पूर्णत्व कडे जाण्याचा प्रवास मणजे शिक्षण"हि विवेकानंदांची व्याख्या या प्रयोगासाठी त्यांनी प्रमाण मानत "नाई  तालीम शिक्षण पद्धती"चे हेच सूत्र म्हणून स्वीकारले. मन, शरीर, आत्मा या सर्वांचे विकास साधन म्हणजे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या करून त्यांनी कवळ परमपरागत शिक्षण  आजच्या आधुइक भारताच्या निर्मितीस  सहायभूत होणार नाही हे जाणून नाई  तालीम  ची रचना म्हणजे त्यांच्या शिक्षण विषयक विचारनच्या आत्मीयतेचे उदाहरणच होय .                    ३१ जुलै १९३७ च्या हरिजन मध्ये गांधीनी आपले शिक्षण विषयक विचार२२-२३ओक्टोंबर१९३७ च्या वर्धा शिक्षण परिषदेच्या धर्तीवर व्यक्त केले.डॉक्टर  झाकीर हुसेन हे त्या समितीचे अध्यक्ष होते तर विनोबा भावे  सारखे विचारवंत नई  तालीम च्या अनुसंधानात निमग्न  होते . मातृभाषा शिक्षणा साठी आवश्यक असे मध्यम असा विश्वास या महापुरुषांना होता.  महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारन्या साठी हस्त कौशल्याधारित कृषी प्रधान भारताच्या अर्थव्यावास्तेला गती देण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या या पद्धतीला "वर्धा शिक्षण पद्धती" असेही संबोधन केले जाऊन एक मुक्त शिक्षण पद्धती म्हणून यांस बघितल्या गेले.भारतीय ,धर्म संस्कृतीस अनुसरुन असनाऱ्या या यावस्थेचे जसे काही गुण आहेत तसेच काही दोषही आहेत. अर्थात प्रत्येकच व्यवस्था हि एका विशिष्ट कालात  निर्माण होत असते आणि कालानुरूप परिवर्तनही त्यात  गरजेचे ठरते. मात्र गांधी यांच्या द्वारा निर्मित या शिक्षण व्यवस्थेचे समकालीन प्रयोजन नष्ट झाले आहे का याचाही विचार शिक्षण विचारवंतानी करावा लागेल .संगणकाच्या या काळात प्रत्येक काम क्लिक वर आधारित आहे मात्र मानवी नितीमुल्यही याच मातीमध्ये मान टाकून मरत असतानाच या पद्धती मध्ये याची काही उत्तरे आहेत का? याचाही शोध घेणे महत्वाचे ठरेल .असो,पण या शिक्षण पद्धतीचा उपयोजन यत्न  स्वातंत्र्योत्तर काळातही होतच राहिला .नितीमुल्याधीष्टीत शिक्षण व्यवस्थेचा प्रयास करणाऱ्या कोठारी कमिशनने ही या पद्धतीची सुत्रे प्रमाण मानली.मग आज जागतिकीकरणाच्या या युगात गांधींची नाई तालीम आज किती प्रासंगिक? आणि कशी? हा जरी एक संशोधनाचा विषय असला तरीही या विषयी चे कुतूहल मात्र लोक माणसात अजूनही जागृत आहे . हल्लीच काही तरुणांनी इयत्ता सातवी पर्यंत हा उपक्रम वर्ध्यात राबून बघितला.मात्र सरकारी धोरणे आणि पालकांची भूमिका  यांमुळे मात्र त्यांना हा नाद सोडवा लागला.  २१ व्या शतकाच्या या संगणक युगात गांधींचा हा आदर्शवाद वस्तवाच्या धरतीवर कसा योग्य आहे याची मांडणी आजच्या काळाच्या गांधीवादी विचारवन्तांकडून होणे गरजेचे आहे. एके काळी मुस्लिम आणि लीग च्या लोकांकडून होणाऱ्या  विरोधातही या पद्धतीच्या उपयोजनाचा झालेला यत्न  आणि तुनुसा गुरी माकाकुची  सारख्या जपानी विचारवंतानी  त्यांच्या  देश्यात नई  तालीम रुजऊ पाहत आहेत मात्र  स्वातंत्र्य पूर्व राष्ट्रीय शिक्षण पद्धती भारतात मात्र रुजू शकली नाही आणि पर्यायाने इतिहासाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या गुणांसाठीच हा विषय घोटावा लागू नये याची काळजी घेणे तितकेच गरजेचे ठरले.  

                                                                                                                                                                                                                शेवटी एवढेच प्रत्येक व्यक्ती आणि व्यवस्था हि आपल्या काळाचे अपत्य असून गांधीही त्यास अपवाद नाहीत . महापुरुषांच्या कार्याचे मूल्यमापन मात्र येणारा भावी काळच करेल.          

Tuesday 2 September 2014

 लाइफ इज ब्युटीफुल,कन्डीशन अप्लाय 

      लाइफ इज ब्युटीफुल,कॅन्डीशन अप्लाय                                                                                                                                                                                                                                                                                               जीव सृष्टी च्या  इतिहासात जणू युद्ध हा एक जीवनावश्यक भाग असावा इथ पर्यंत वारंवार घडत असतो,युद्ध नको शांती हवी हे समजून घ्यायला मात्र आनेक शतके आणि सहंसत्रके जावी लागलीत.समस्त मानव जातीच्या इतिहासात या युद्धानी आपला अमिट  ठसा उमटवला आहे. असेच अनेक कारणांतून निर्माण झालेले दुसरे महायुद्ध हे जागतिक मानवी इतिहासाला वळण देणारे ठरले. ज्वलंत आणि जिवंत वंशवादी आणि हुकुमशाही मानसिकतेने पिळीत झालेल्या काळाचाच तो परिणाम होता. नाझी आणि फासीवादी राजकारणाने जागतिक मानस पटलावर खळबळ माजवली होती.हिटलर,मुसलोनी सारख्या धूर्त शासकांनी आत्त्यान्तिक  राष्ट्रवादाच्या प्रयोगाने आहाकार निर्माण केला होता.ज्यू हेच आजच्या विपरीतास जबाबदार आहेत हा ग्रह करून देत सत्तेवर आलेला हिटलर आज ज्यूंच्या आत्म शुद्धीच्या नावा खाली "लक्ष छावणी" च्या माध्यमातून त्यांचीच कत्तल करत होता . लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा रंग या युद्धास देण्यात आला होता मात्र हा होता तो मुळी  सत्ता संघर्ष.

 या  विषयावर अनेक अशा प्रकारचे साहित्य आणि इतिहास लेखन केल्या गेले मात्र ज्या अभीव्यक्तीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे १९९७ साली निर्माण झालेल्या एका हृदय स्पर्शी चित्रपटणे . life is beutiful नावाचा या चित्रपटा चे दिग्दर्शन केले आहे ते रोबर्तो बेन्जीनी यांनी.उत्तम कथानक,इतिहासाची पार्श्वभूमी, हृदय स्पर्शी संवाद, सुरेख दिग्दर्शन,संपादन लाभलेला हा चित्रपट मानवी भाव भावनांची अभिव्यक्ती ठरावा. चित्रपटाचे कथानक हे मुळात एका परिवार भोवती फिरत राहणारे आहे. ग्युडो हा एक स्वछन्दी  माणूस आपल्या एका मित्र सोबत इटली मध्ये फिरत असतो. फेल झालेले ब्रेक आणि त्या मुळे  मिळालेले अनौपचारिक स्वागत हे मोठ्या गमतीदार रीतीने साकारले आहे. १९३९ मध्ये या चित्रपटाची झालेले सुरुवात हि महायुद्धाच्या समाप्तीने संपन्न होते.ग्युडोला प्रवासात झालेली प्रीयसीची भेट हा तर आक विषय ठरावा.दोराचे प्रेम मिळवण्या साठी ग्युदोने उपसलेले कष्ट त्यातून निर्माण झालेला मार्मिक विनोद हा चित्रपटाचा गाभा आहे.पुढे ग्युडो रोजगारासाठी पुस्तकाचा व्यवसाय सुरु करण्या साठी सरकारी कार्यालयाच्या वाऱ्या  घालतो पण तेथे त्याला केवळ सरकारच्या मागृरीलाच सामोरे जावे लगते,मात्र तेथेही आपल्या विनोदाने ग्युडो व्यवस्थेवर मार्मिक असे व्यंग करातो .

         
ग्युडो पुढे हॉटेल मध्ये वेटर चे काम पत्करतो तेथे ही तो आपल्या हजार जवाबी शायली ने रसिकांना खिळून ठेवतो.शाळा तपासणी आणि ग्युडोचे डोरा साठी केलेले नाटक,ओपेरा मधील प्रसंग,ओपेरा नंतर झालेली डोरा ची भेट दिग्दर्शकाने मोठ्या समर्थ पणे मांडली  आहे. ज्या हॉटेल मध्ये ग्युडो कामाला असतो तेथेच डोरा चे लग्न नियोजित असते मात्र या वेळी डोरा ग्युडोला पळून न्यायला सांगते आणि अश्या प्रकारे उभयतांचे मिलन होत नवे  सृजन जन्मास येते ते जोशिवाच्या रूपांने या  प्रसंगी दिग्दर्शकाने मांडणीचा अद्द्भूत नमुना पेश केला आहे. जोसिवा आपल्या बाल सुलभ अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतो. "ज्यू  आणि कुत्र्यांना प्रवेश बंद " अशी पाटी  वाचाल्यानानातर छोटा जोशीवा त्या बाबत ग्युडो ला  विचारतो,तेव्हा "ज्याला जे आवडत नाही ते तो नाकारतो" आशी समजूत काढत "तुला कोण नाही  आवडत?" या प्रश्नाचे उत्तर छोटा जोशीवा"कोक्रोच" असे देतो, तर ग्युडो मला "वाईट लोक" आवडत नसल्याचे सांगतो . हा संवाद म्हणजे जोशिवाच्या निरागस मनावर होणारे संस्कार कश्या प्रकार चे व्हावेत याची काळजी घेणाऱ्या बापाचे चित्रण रेखाटणारा आहे.
        पुढे युद्ध काळात मात्र अनेक ज्यू परिवार सोबत ग्युडोचीही जोशीवा सोबत उचलबांगडी केली जते.त्या वेळी डोरा आपल्या अद्भुत प्रेमचा  आदर्श प्रस्तुत करत लष्करी अधिकार्याच्या मनाईला न जुमंतही कॅम्प मध्ये जाणार्या ट्रेन मध्ये जाऊन बसते . झालेली माणसांची  तुटवणूक  प्रेमाची  विन मात्र अधिकच घट्ट करते या वेळी जोशीवा चा बाप म्हणून पार पाडलेली भूमिका प्रत्त्येकाच्या लक्षात राहणारी अशीच आहे. छावणी मधील हाल अपेष्ट , दुक्ख, यातना ,मरण, ग्यास चेम्बर यांचा कशाचाही बोध तो जोशीवाला होऊ देत नाही . विनोद आणि दुक्ख यांचे मिश्रण म्हणजेच का जीवन हा प्रश्न जन मांणसाला  आल्या वांचून राहत नाही.पण मधे एका ओळखीच्या डॉक्टरांच्या मध्यमातुन मुक्त होण्याचा मार्ग ग्युडो ला मिळतो पण तेथेही त्याचा वापराच करून घेण्याची मानसिकता दिसून येते. मात्र युद्धाच्या समाप्तीचा धामधूमित ग्युडो पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण डोरा च्या प्रेम पोटी तिला शोधत असत्तानाच तो पकडल्या जातो आणि एका सामान्य कुटुंब वत्सल मानसाचा  व्यवस्थेकडून खून करवला जातो. हा केवळ एक खेळ  आहे हे ग्युडो जोशिवाला बोलला असतो आणि त्याचे बक्षीस म्हणजे रांनगाडा हेही त्याने सांगितले असते . युद्ध च्या समाप्ती नंतर सामसूम झालेल्या  छावणी मध्ये रस्त्यावर जोशीवा एकटाच उभा राहतो पण त्या वेळ पर्यंत ब्रिटीश सेना येउन पोहोचली असते.सेनेचा  प्रचंड मोठा रानगाडा  बघून आपण खेळ जिंकल्याची भावना जोशिवाच्या मनात निर्माण होतो. पुढे त्याला त्याची आई हि वाटेत मिळते.  
                                                                                                                                                                 अशा प्रकारे एक चित्रपट तर समाप्त होतो पण प्रेक्षकांना पुढे प्रश्न मांडूनच . la vita e vell हे इटालियन नामाभिधान असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना साद घालतो आहे आणि मानवते समोरील प्रश्नांना वाचा फोडतो आहे. १९९७ पासून ते आज तागायत या चित्रपटा ने अनेक मान सन्मान पटकावले आहेत. त्यात ऑस्कर सोबतच,७१वा  अकादमी पुरस्कार ,बेस्ट द्रमातिक,बेस्ट विदेशी भाषा पुरस्कार आदी सह अनेकांचा समावेश आहे. रोबारतो बेन्जीनी यांनी साकारलेले ग्युडोचे व्यक्ती चित्रण तर अद्भुत आहेच शिवाय डोरा चे काम निकोलात्ता ब्रांची यांनी अप्रतिम साकारले आहे. गिओर्जिओ कातरणी या बाल कलाकाराने साकारलेला जोशीवा चा अभिनय हि काळजाचा ठोका चुकवणारा आहे. शोकात्मक विनोद हा या चित्रपटाचा प्रकार आहे मात्र जीवनाची सर्थाकताच जणू यातून उद्दघ्रूत होत्ताना दिसून येते. जीवन खरच खूप सुंगर आहे पण त्याची किमत ज्याची त्यालाच चुकवावी लागते ,ती ग्युडो ने चुकवली आणि जीवनाची लढाई त्याने जिंकली. आत्ता कदाचित वेळ आपली आहे.खरच लाइफ इज ब्युटीफुल,कॅन्डीशन अप्लाय म्हणतात ते यालाच.