OPEN FRAME
"Cultivation of mind should be the ultimate aim of human existence." - Dr. B. R. Ambedkar
Thursday, 3 July 2025
Thursday, 5 June 2025
होय होय वारकरी : भूमिका
आहे त्या पेक्षा जगाला सुंदर करण्यासाठीच्या प्रयत्नांत मराठी संत आणि त्यांच्या चळवळीचा वाटा अत्यंत मोलाचा राहिला आहे. भारतीय सामाजिक परिपेक्षात भक्ती चळवळीने केलेले अभूतपूर्व सामाजिक प्रबोधन कार्य पुढे दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक बदलांच्या चळवळीची पायाभरणी करणारे ठरले. मराठी संतांच्या क्रांतीकार्याचे योगदानही निश्चितच या कामी कोणत्याही अर्थाने कमी नाही. भारतीय समाजाच्या पुनर्जागरणाचा आद्य काळ म्हणजे मध्ययुगीन भक्ती चळवळ होय. या माध्यमातून भारतीय समाजाच्या मुलभूत प्रश्नांना हात घालत संतांनी सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. आणि महाराष्ट्र हे त्या क्रांतीचे केंद्र ठरला.
लिंगायत, महानुभाव, वारकरी आणि अशा अनेक समतावादी विचार मांडणारे धर्म, तत्वज्ञान आणि आचार प्रवाह महाराष्ट्राच्या या भूमीत निर्माण झाले. सामतामुलक समाजासाठी धर्म चिकित्सा आणि त्याअनुषंगिक आचार पद्धतीचा पुनर्शोध घेत सर्वसामान्य माणसाला सहज कळेल, रुचेल, पचेल आणि त्याही पुढे जात तो सकळहितवादी असा होता. या परिवर्तनासाठी कोणत्याही रक्तरंजित क्रांतीची आवश्यकता संतांना वाटली नाही. माणूस बदलतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि हृदय परिवर्तन हे त्यांचे पद्धतीशास्त्र होते.
सर्वार्थाने विषम-विपरीत अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परीस्थितीत संतांनी केलेले अभूतपूर्व सामाजिक वर्तन बदलाचे प्रयत्न आजच्या आधुनिक काळातील परिपेक्षात मर्यादित वाटत असले तरीही ते भावी समाजजीवनाची पायाभरणी होती. संतांच्या अध्यात्मिक लोकशाहीकडे याच दृष्टीकोनातून आज आपणास बघावे लागेल. सामाजिक बदलांच्या शस्त्रविहीन लढाईत संतांनी केलेला त्याग, सोसलेली सामाजिक कुदृष्टी आणि हालपेष्टा, प्रसंगी दिलेले बलिदान यांचे सातत्यपूर्ण चिंतन आजच्या स्वयंघोषित आणि बेगडी साधुत्व, स्वार्थी वृत्ती, कट्टर आणि संकुचित धार्मिकतेच्या या काळात अत्यंत महत्वाचे ठरते.
मुळात, संत आणि त्यांचे वांद्मय केवळ सामाजिक मुलभूत प्रश्न आणि समस्यांवर केवळ भाष्य करून थांबले नाहीत तर पराकोटीच्या करुणेने त्यांनी या समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. निसंशय कोणत्याही महामानवांना स्थळ-काळ आणि अन्य तत्कालीन समाजिक परीपेक्षच्या मर्यादा असतात तश्याच मराठी संतांनाही या होत्याच. मात्र या मर्यादा भेदण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांनी केला आहे.
संतांच्या या करुणामय विद्रोहाची समकालीन मांडणी ‘होय होय वारकरी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ह.भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वारकरी परंपरेचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास, या परंपरेचा उगम, तिच्या तत्वज्ञानाची बहुपदरी बैठक, संतपरंपरेतील अंतःप्रवाह आणि बहुस्तरिय सामाजिकता, वारकरी विचारविश्वावर इतर विचारसरणींचा आणि इतरांवर वारकरी विचारांचा झालेला परिणाम आणि प्रभाव याचे मुद्देसूद आणि प्रसंगोपात विश्लेषणात्मक मांडणी लेखकाने केली आहे. भारतीय समाजातील जाती आणि लिंगभेदाचा प्रश्नही या माध्यमातून संतांच्या जीवनचरित्र आणि विचारांचे दाखले देत त्यांनी ऐरणीवर आणला असून विषमतावाद आणि समतावादी विचार यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष वारकरी परंपरेच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न ही लेखकाने केला आहे.
बहुदा वारकरी समुदाय आणि विचारांची मांडणी सांस्कृतिक अंगांनीच करण्यावर विशेषतः आजचा मिडिया आणि नवोदितांचा कल असतांच ह.भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांनी मात्र या परंपरेचे सांस्कृतिक आणि धार्मिक सत्तांविरुद्ध उभा केलेला वैचारिक संघर्ष, तिचा ऐतिहासिक विकासक्रम, आणि आधुनिक काळात तिच्यात झालेल्या सांस्कृतिक विकृतीकरणाचे भान ठेवत सामाजिक अंगाने परखड चिकित्सा करत या परंपरेतील मूलगामी मूल्यांचा शोध घेतला आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून वारकरी परंपरेचा केवळ एक धार्मिक प्रवाह म्हणून नव्हे, तर तो एक सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा आणि समतेच्या मूल्यांवर आधारित सांस्कृतिक आंदोलन म्हणून समजून घेण्याचा एक अभ्यासपूर्ण प्रयत्न लेखकाने केला आहे.
या प्रयत्नांत खारीचा वाटा देता आला याबद्दल ‘कोरो इंडिया’ आणि परिवाराचा भाग म्हणून आम्हाला आज अत्यंत आनंद ताटतो. स्वतः ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर यांचाही वर्ष २०२२ पासून समता फेलोशिपच्या माध्यमातून ‘कोरो इंडिया’चा एक कार्यकर्ता म्हणून आत्मीय संबंध आहे. ‘कोरो इंडिया’च्या याच प्रक्रियेत ‘अत्त दीप अकादमी ऑफ ग्रासरूट लीडरशिप’ या विशेषतः तळातील ज्ञाननिर्मिती, प्रचार-प्रसार, उपयोजन, संयोजन आणि पथ प्रदर्शन (डेमोनस्ट्रेशन) यासाठी कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेचाही मोलाचा वाटा आहे. अकादमीच्या माध्यमातून होत असलेल्या बृहद ज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘होय होय वारकरी’ हा अत्यंत महत्वाचा सामाजिक दस्तावेज वाचकांच्या हाती येतो आहे याबद्दल कृतज्ञता वाटते. ‘कोरो इंडिया’ आणि ‘अत्त दीप अकादमी’च्या या आणि अशा जनकेंद्रित प्रक्रियांच्या माध्यमातून यापुढेही असेच सकस साहित्य निर्माण होत राहील. अर्थात त्याचा पाया समता आणि आपली संविधानिक मुल्ये असतील.
कुणाल रामटेके
Sunday, 30 June 2024
संथाल हूल दिवस : जिसे हमे कभी भूलना नहीं चाहिए।
संथाल हूल दिवस : जिसे हमे कभी भूलना नहीं चाहिए।
महात्मा गांधी द्वारा मुंबई के गोवलिया टैंक मैदान में 1942 को दी गई "करो या मरो" को घोषणा के बारे में हम सभी ने इतिहास की किताब में पढ़ा हैं। हमने यह भी पढ़ा की कैसे इस घोषणा ने अंग्रेजी सत्ता की नीव को जड़ से हिला डाला। लेकिन हम में से कितने लोगो को सिधो, कान्हो, चांद, भैरव और इन चारो की बहने फूलो और झानो के बारे में पता है ? हम में से कितने लोग हूल दिवस को और इसके ऐतिहासिक महत्व के बारे में जानते है?
यह वह दिवस था जब इतिहास में पहली बार संथाल योद्धाओं ने "करो या मरो" का नारा देकर सामंतवाद, भेदभाव, शोषण और अंग्रेजी सरकार के दमनकारी शासन के विरोध में आज के झारखंड के साहिबगंज के भगोडिया में 30 जून 1855 को 50 से जादा गांवो से आए आदिवासी, दलित, बहुजन योद्धाओं ने एकत्रित आकर हूल यानी विद्रोह तथा पवित्र क्रांति की घोषणा की थी। जिसमे फूलो और झानों ने लगभग एक हजार से जादा महिलाओं का नेतृत्व किया था। आज यह महिलाए स्वतंत्रता संग्राम सेनानियों की सूची से भी गायब है।
आगे चलकर इस हूल के नायक सिधो और कान्हो को अंग्रेजो द्वारा सरेआम फांसी दी गई। उन्हें लगा की अब यह विद्रोह शांत हो जायेगा लेकिन आदिवासी अब और भी अधिक जागृत हो गए थे। उन्होंने इस विद्रोह को 1856 तक शुरू रखा लेकिन अंग्रेजो के अत्याधुनिक तकनीक के आगे उनके परंपरागत तीर-कमान जादा टिक न सके। इसके बाद भी यह संघर्ष सुदूर जंगलों में चलता ही रहा। जिसके बदौलत अंग्रेजों को अपने कानून में भी कई बदलाव करने पड़े।
आगे चलकर इसी हूल की प्रेरणा से धरती आबा बिरसा मुंडा खड़े हुए। जिन्होंने आदिवासियों के जल, जंगल और जमीन और संस्कृति के बचाव में कड़ा संघर्ष किया।
यह हूल दिवस ही भारत का पहिला विद्रोह था जिसे बाद में इतिहास से भुला दिया गया। आदिवासियों का जो महान संघर्ष पीढ़ियों से चल रहा है, उसको आदरपूर्वक संज्ञान में लेते हुए भारतीय संविधान में घटनाकर्ताओं ने पांचवी और छटी अनुसूचियों के साथ ही उनके अधिकारों को सुनिश्चित करने की दिशा में कई कानूनों का संकल्प किया है। आदिवासियों को मूलभूत समस्याओं के संघर्ष को बदलते दौर में इसी संविधानिक रास्ते से आदिवासी लड़ रहे है। जल, जंगल, जमीन और संस्कृति की रक्षा के लिए एक हो रहे है।
आज, हमारे आदिवासियों की प्रेरणा रहे इस 'हूल दिवस' को याद करते हुए आदिवासी संघर्ष को हूल जोहार।
Tuesday, 1 March 2022
Sunday, 18 July 2021
Tuesday, 22 June 2021
चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ : बल्लारशाहच्या हर्षालीची प्रेरणादायी यशोगाथा
![]() |
हर्षाली सोबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रांगणात |
कोणत्याही सकारात्मक बदलांची सुरुवात ही स्वतः पासून होते असं म्हणतात. पण स्वतःच्या कुटुंबाची कोणतीही आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी नसतांना स्वतःला सावरतच कुणाच्यातरी बदलांच्या प्रक्रियेत आपणासही वाटेकरू होता येत असेल तर ती निश्चितच मोठी गोष्ट ठरते. मग अशाच कठोर परिश्रमातून स्वतःला घडवणाऱ्या ‘कहाण्या’ इतरांनाही निरंतर प्रेरित करीत जातात. हा प्रेरणेचा झरा मोठा होत जातो आणि त्यातूनच सामाजिक परिवर्तन घडत जाते. मुळात, सामाजिक क्रांती, परिवर्तन, पुरोगामित्व या आणि अशा संकल्पना आपल्या राज्यात नेहमीच आपण वापरत असतो. मात्र हे परिवर्तन घडणे वाटते तितके सोपे निश्चितच नसते. त्यासाठी लागणारी वैचारिक स्पष्टता आणि परिश्रमाची तयारी आपणास करावी लागते. त्यातही भारतासारख्या जाती-वर्ग-लिंगभेदाने ग्रासित असलेल्या समाजात एक महिला म्हणून स्वतःला सावरणे, पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्वतःला उभे करणे आणि आपली सामाजिक बांधिलकी मानून परिवर्तनासाठी सिद्ध होऊ पहाणे हे सारेच कठीण आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या हर्षाली नगराळेच्या प्रवासाकडे बघितलं की कुणालाही वाटेल हे सारे ‘शक्य’ आहे!
हर्षालीचा जन्म गावकुसाबाहेरच्या दलित वस्तीतला. वडील निवृत्त गिरणी कामगार आणि आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताचीच. आणि अर्थातच कोणत्याही प्रकारचे सामाजिक-आर्थिक पाठबळ नसलेली. पण कोणत्याही दलित कुटुंबाला मिळालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा समृद्ध असा विचार-वारसा मात्र भक्कमपणे तीच्या समोर उभा होता. बालपणापासूनच तिला आपल्या वस्तीत असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मोठं आकर्षण वाटत होतं. क्षितिजाकडे असलेल्या त्या पुतळ्याचं बोट जणू तिला नवी भरारी घ्यायलाच प्रेरित करीत होतं. मग आपणही आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे ‘खेड्यातून शहराकडे’ जावं, उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या ‘पे बॅक टू सोसायटी’ या संदेशानुसार ज्या शोषित-वंचित समाजात आपण जन्मास आलो त्या समाजासाठी काही तरी करावं हा विचार तीच्या मनात सातत्याने घोळत होता. मात्र ‘नेमकं काय करावं ?’ हे मात्र वळत नव्हतं. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘भौतिकशास्त्र’ या विषयात पदवीचा अभ्यास करीत अनेक बरे-वाईट अनुभव गाठीशी येत गेले. चांगले मित्र लाभले. मग विज्ञानासोबतच सामाजिक विषयांचं ही वाचन वाढत गेलं. त्यातून आपल्या समस्यांचे स्वरूप जरीही ‘भौतिक’ वाटता असले तरीही त्यांचे इतरही असंख्य कंगोरे इथल्या व्यवस्थेच्या तळाशी असतात हे तिला जाणवायला लागलं. शोषण, अन्याय, अत्याचार यावर आधारित असलेली सामाजिक व्यवस्था बदलवून समतेवर उभा असणारा समाज का स्थापन होऊ शकत नाही ? असे अनेक प्रश्न तिच्या मनात घर करून उभे रहात होते. इथल्या व्यवस्थेने हजारो वर्षांच्या कालखंडात एका बृहद अशा समाजाला अस्पृश्य म्हणून हिनवत त्यांना त्यांचे मानवाधिकारही नाकारले होते. या देशातील महिला आणि त्यातही दलित महिला तर इथल्या व्यवस्थेच्या अत्यंत खालच्या स्तरावर राहण्यासाठी विवश होत्या. जोवर इथल्या सामाजिक सस्यांचा शोध घेतला जात नाही तोवर परिस्थिती बदलणं निव्वळ अशक्य आहे असं वारंवार तिला वाटून जात होतं. त्यातच तिला मुंबईस्थित ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’त चालविला जाणाऱ्या ‘विमेन सेंटर प्रॅक्टिस’ या विषयातील पदव्योत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. व्यावसायिक समाज कार्याचे शिक्षण देणारी जगात तिसरी आणि आशिया खंडात पहिली असणारी ‘टाटा इन्स्टिट्यूट’ ही ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे. दर वर्षी या संस्थेच्या निवड प्रक्रियेत लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात. बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळतो. हर्षालीने ही परीक्षा दिली आणि यशस्वीरीत्या ‘टीस’ला प्रवेश मिळवला. तिथलं सारच वातावरण भारून टाकणारं होतं. विचारांना चालना देणारं होतं. हर्षाली इथल्या विद्यार्थी चळवळीत सहभागी झाली. दुसऱ्या वर्षाला तर इन्स्टिट्यूटच्या छात्रसंघच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभी राहिली. हे सारे अनुभव खूप काही शिकवून जाणारे होते. त्यातूनच व्यवस्था बदलायची असेल तर आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशात निवडणुकी शिवाय दुसरा चांगला मार्ग नाही याची खात्री तिला पटत गेली. बाबासाहेबांनी इथल्या शोषित-वंचितांना शासनकर्ती जमात होण्यास सांगितलं आहे. हा प्रवास मात्र निवडणुका, लोकशाही आणि त्यासाठी सामान संधी या मार्गानेच आपल्याला करावा लागेल, हे हर्षालीला आता उमजू लागलं होतं.
मुळात, ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ आपल्या विद्यार्थ्यांना पोषक वातावरण, अनुभव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नरत असते. या संस्थेच्या अकादमीक कार्याचा भाग म्हणून राबवण्यात येणाऱ्या ‘अंतर्वासिता’ सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठरतात. हर्षालीने या काळात मुंबईच्याच ‘महिला राजसत्ता आंदोलना’त आपली अंतर्वासिता पूर्ण केली. त्यातून राजकीय क्षेत्रात आणि त्यातही पंचायत राज क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांवरील होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाबद्दल तिला माहिती मिळत गेली. पुढे त्यातूनच ‘ग्राम पंचायतींमध्ये महिला प्रतिनिधींचा लैंगिक छळ’ या विषयावर तिने संशोधन केले. त्यासाठी २०१८ साली झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय कॉंग्रेस परिषदे’मध्ये अत्यंत महत्वाच्या अशा ‘मार्था फरेल पुरस्कारा’ने तिला सन्मानित केले गेले. हर्षालीला आता आपलं ‘क्षेत्र’ गवसलं होतं. आणि ही बदलांची नांदी होती.
पुढे ‘महिला आणि राजकारण’ या विषयावर काम करीत असतांनाच हर्षालीला पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचार मोहिमेत प्रशांत किशोर यांच्या ‘भारतीय-राजकीय कृती समिती (आय.-पी.ए.सी.) मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून महिला राजकारणात आल्या तर काय बदल घडवता येऊ शकतात याचा प्रत्यक्ष अनुभाव तिला येत गेला. हर्षालीला आता सक्षम आणि सर्वसामावेशक लोकशाहीसाठी निवडणुकीचे राजकारण या क्षेत्रात काम करायचे आहे. त्यासाठी तिची लंडन येथील अत्यंत प्रतिष्टेच्या अशा ‘रॉयल होलोवे’ विद्यापीठात ‘निवडणूक मोहीम आणि लोकशाही (Election Campaign and Democracy) या विषयात ‘एम.एस.सी.’ या पदव्योत्तर पदवीसाठी निवड झाली आहे. मुळात, कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अशी निवड होणे अत्यंत मानाचेच आहे. मात्र, आता तिला गरज आहे या बदलांच्या प्रक्रियेत आपणही तिच्यासोबत वाटेकरी होण्याची. बेताच्या आर्थिक परिस्थितीत हर्षालीने आपले आजवरचे शिक्षण पूर्ण केले ते केवळ सरकारी स्कॉलरशिप आणि स्नेहीजनांच्या मदतीच्या भरवशावर. या कोर्सची फी, राहण्याखाण्याचा-प्रवासाचा खर्च हे सारेच तिच्या आईवडिलांना तर झेपण्यापलीकडचेच आहे. त्यासाठी गरज आहे ती आपणही समाज म्हणून उभे राहण्याची. हर्षालीचा हा कोर्स येत्या २० सप्टेंबर (२०२१) पासून सुरु होतोय. त्यासाठी तिने आपणासर्वांनाच मदतीचे आवाहन केले आहे. या बाबतची पारदर्शकता ठेवण्यासाठी तिने ‘मिलाप’ या अधिकृत माध्यमाची मदत घेतली आहे. आपणही हर्षालीचे हे कँपेन ‘https://milaap.org/fundraisers/support-harshali-3’ या लिंक वर बघू शकता किंवा ‘harshalinagrale21@gmail.com’ या तिच्या ईमेल ऍड्रेस वर तिला प्रत्यक्ष संपर्क करत आपली ऑनलाईन आर्थिक मदत तिला पोहचवू शकता. भारतीय रुपयांमध्ये तिला लागणारा हा खर्च पुढील प्रमाणे आहे. -
शिकवणी फी: १८,०६,००० रुपये.
भोजन आणि निवास खर्च: (११ महिन्यांसाठी): १६,००,००० रुपये.
इतर खर्चः १,००,००० रुपये
व्हिसा आणि विमान प्रवास: १,४५,००० रुपये.
एकूण खर्च : ३६,५१,००० रुपये.
मुळात, हर्षालीचा चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ हा सारा प्रवासाच अत्यंत प्रेरणादायी आहे. गरज आहे ती आपणही या तिच्या प्रवासात आर्थिक मदत करून तिला साथ देण्याची.
-कुणाल रामटेके,
लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक असून त्यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई’तून ‘दलित-आदिवासी अध्ययन व कृती’ या विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे.
Tuesday, 8 September 2020
'अशोक चक्र' से जाती ढूंड लेनेवाले लोग कौन है ?
साथी सुजीत निकालजे और परिवार पर हुए जातिगत हमले के सन्दर्भ में रिपोर्ट
मुंबई स्थित ‘टाटा समाजिक विज्ञान संस्था’ के हमारे साथी तथा पीएचडी स्कॉलर अॅड. सुजीत निकालजे और उनके परिवार पर हुवा कथित जातिगत हमला आज भी भारतीय समाज की उस समस्या को अधोरेखित करता है जिसके दृढ़ीकरण हेतु धार्मिक बहुसंख्यक समाज का प्रतिक्रान्तिवादी तबका पुरे जोर-शोर से अपने समरसतावादी अजेंडे के साथ लगा पडा है. यह हमला भारतीय संविधान के आधार पर स्थापित सरकार के कान के निचे प्रतिक्रिया और शोषणवादी ताकतों द्वारा की गई वह जोरदार आवाज है जिसे समय रहते ही सूना गया होता तो सुजीत जी और उनके परिवार जैसे प्रातिनिधिक शोषण के हज़ारों उदाहरणों को बढ़ने से शायद रोका जा सकता था. खैर, हम मित्र जितना सुजीत जी को जानते है, उनके पास मदत के लिए गया शायद ही कोई ऐसा व्यक्ति रहा हो जिसे खाली हाथ लौटना पडा हो. मूलतः वे एक अजातशत्रु व्यक्तित्व के धनि और एक अंबेडकरवादी होने के नाते सामाजिक कार्यों में अग्रसर रहते है. खैर, सोशल मीडिया पर प्रकाशित उनके और उनके परिवार पर हुवे जातिगत हमले की खबर निश्चित तौर पर दुख:द और निषेधर्ह्य है.

संबंधित घटना पर प्रा. डॉ. सुनील अभिमान अवचार जी का चित्र
गौरतलब है की, कोरोनाकाल की महामारी से बचने हेतु सरकार द्वारा लगाए गए सार्वत्रिक तालाबंदी के चलते सुजीत जी को अन्य छात्रों की भाँती महाराष्ट्र के फलटन जिले के अपने पैतृक गॉव को वापिस लौटना पड़ा. इसी बिच परिवार समेत अपने खेत में चल रहे काम के पश्चात उन्होंने कुछ देर पास ही के ‘धुमालवाडी’ स्थित एक जलप्रपात को देखने को जाने का मन बनाया. साथ में उनकी पत्नी, भाई और भाभी भी थे. इसी बिच जलप्रपात पर आवारागर्दी करते पड़ोस के ही हणमंतवाड़ी गाँव के कुछ कथित उच्च जातीय असामजिक तत्वों ने सुजीत जी के परिवार की स्त्रियों के साथ छेड़खानी करते हुवे अभद्र भाषा का प्रयोग करना शुरू किया. जिसे रोकने और समझाने की कोशिश भी सुजीत जी और उनके भाई द्वारा की गई. इसके विपरीत उन बदमाशों ने कुछ अन्य साथियों लाठी और कथित हथियारों समेत वापस आकर सुजीत जी और उनके परिवार का रास्ता रोक अनुचित व्यवहार का घोर प्रदर्शन किया. इसी बिच उन असमाजिक तत्वों की नज़र सुजीत जी के गाडी पर लगे ‘अशोक चक्र’ के ऊपर गई जो की केवल भारतीय दलित - बहुजन समाज के अस्मिता चिन्ह ही नहीं अपितु भारतीय संविधानिक गणराज्य का भी मानचिन्ह है, और जो अत्यंत सामान्य रूप से समता के एक प्रतिक के रूप में हमेशा इस्तेमाल किया जाता है. इसी से उन कथित उच्च जातीय असमाजिक तत्वों को सुजीत जी और उनके परिवार की कथित निचली जाती के होने का अनुमान लगाकर उनपर हमले का ‘बड़ा अवसार’ मिल गया. हमलावर अत्यंत अश्लील भाषा का प्रयोग करते हुवे सुजीत जी की जाती और उनके के सन्दर्भ में घृणास्पद भाषा का प्रयोग कर रहे थे. उन्हें रोकने की कोशिश के चलते सुजीत जी, उनकी पत्नी, उनके भाई तथा भाभी पर जोरदार हमला किया गया. जो निश्चित तौर पर बड़ी जातियों के सामने संविधानिक प्रतिरोध का नकारात्मक नतीजा था. इस हमले में सुजिती जी और उनके परिवार के अन्य सदस्य गंभीर रूप से जखमीं हुए. यह घटना दिनांक 6 सितंबर 2020 को हुई.
